सांडपाण्याच्या वायूवर दोन हजार बसगाड्या चालतील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2015

सांडपाण्याच्या वायूवर दोन हजार बसगाड्या चालतील

मुंबई : मुंबईसारख्या महानगरांतून समुद्रात सोडल्या जाणार्‍या सांडपाण्यातून निर्माण होणार्‍या जैविक वायूवर (बायोगॅस) किमान दोन हजार बसगाड्या चालवता येऊ शकतात. यासाठी लागणारे तंत्रज्ञान सरकार मिळवत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.
मुंबई आणि जेएनपीटी बंदरात समुद्रात पसरणार्‍या तेल तवंगावर नियंत्रण आणण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या यंत्रणेचे उद््घाटन शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डहाणू येथील बंदरासाठी वनखात्याची जमीन घेतली जाणार नाही. वन क्षेत्राला हात न लावता खाडीत भराव करून यासाठी जागा तयार केली जाईल, असे ते म्हणाले. आर्थिक विकास साधताना पर्यावरण आणि विकास हातात हात घालून जायला हवा. फक्त विकास वा फक्त पर्यावरण अशी टोकाची भूमिका उपयोगाची ठरत नाही. यात समतोल साधला गेलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. देशातील १२ महत्त्वांच्या बंदरांवर सौर तसेच पवन ऊर्जा निर्माण करण्याची योजना सरकार आखत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS