मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईत मलेरिया व डेंग्यू यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वच आस्थापनांनीआपापल्या क्षेत्रात विशेष काळजी घ्यावी, अश्या सूचना महापालिका आयुक्त व डास प्रतिबंधात्मकसमितीचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी दिल्या आहेत. तसेच ज्या आस्थापनांनी योग्यरित्या कार्यवाही करणार नाहीत, अशांना पत्राद्वारे त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, कार्यकारी आरोग्य अधिकारी (श्रीमती) पद्मजा केसकर, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर आणि समिती सदस्य असणाऱया विविध शासकीय व निम-शासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रामध्ये डासांपासून होणाऱया आजारांच्या प्रादुर्भावाला आळा बसावा. डासांची पैदासहोण्याची ठिकाणे नष्ट करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे. मात्र, शासकीय निम-शासकीय व अशासकीयसंस्थांची जबाबदारी आस्थापने महापालिकेला सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर महापालिकाअधिनियमातील तरतुदींनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही मेहता यांनी सांगितले. तसेचविविध प्राधिकरणांच्या आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रांत कुठेही पाणी साचणार नाही, यासाठी विशेषकाळजी घ्यावी. काही अडचणी असल्यास पालिकेच्या संबंधित खात्यांशी त्वरीत संपर्क साधावा.महापालिका यासाठी सर्वतोपरी मदत करेल. मात्र, वारंवार सूचना देऊनही डास प्रतिबंधासाठी आवश्यकती कार्यवाही होत नसल्यास महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधीतांवर योग्य कायदेशीरकारवाई केली जाईल, असे संकेतही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

