मरीन ड्राईव्हवर लावण्यात आलेले एलईडी दिवे अयोग्य असून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सोडियम दिवे लावावेत, अशीसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींनी केल्याने एलईडी दिव्यांचा भाजपचा आग्रह चुकीचा असल्याचे वदुराग्रह असल्याचे सिध्द झाले आहे. सोडियम दिवे काढून एलईडी दिवे लावण्यात आले, आता पुन्हा एलईडी दिवे काढूनसोडियम दिवे लावण्यात येतील, त्यामुळे यामध्ये झालेला कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे नुकसान झाले आहे.
जनतेच्या करामधून मिळणाऱ्या या पैशाची बरबादी झाली आहे, यासाठी हा खर्च एलईडी दिव्यांचाआग्रह धरणाऱ्या केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोएल यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षसंजय निरुपम यांनी केली आहे. भाजपने एलईडी दिव्यांसाठीचा आग्रह आता सोडावा व एलईडी कंपन्यांची दलाली करुनये, असे निरुमप म्हणाले.केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार एलईडी दिव्यांचा फार आग्रह करत आहे, यादिव्यांच्या माध्यमातून देशाला लुटण्याचा प्रकार भाजपने आता बंद करावा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
जनतेच्या करामधून मिळणाऱ्या या पैशाची बरबादी झाली आहे, यासाठी हा खर्च एलईडी दिव्यांचाआग्रह धरणाऱ्या केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोएल यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षसंजय निरुपम यांनी केली आहे. भाजपने एलईडी दिव्यांसाठीचा आग्रह आता सोडावा व एलईडी कंपन्यांची दलाली करुनये, असे निरुमप म्हणाले.केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार एलईडी दिव्यांचा फार आग्रह करत आहे, यादिव्यांच्या माध्यमातून देशाला लुटण्याचा प्रकार भाजपने आता बंद करावा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

