लेप्टो आणि र-वाईन प-लुने आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) - सुरू वातीला दमदार पडणाऱ्या पावसाने आता दडी मारल्याने मुंबईत विविध साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे खतरनाक र-वाईन प-लुने सोमवार तिघांचा मृत्यू झाला आहे या खतरनाक र-वाईन प-लु आणि लेप्टोने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2372 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. हे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मुंबईमधे 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसात लेप्टोचे 6 रूग्ण मिळाले असून ऑगस्ट महिन्यात लेप्टोचे आता पर्यन्त 20 रूग्ण मिळाले असून 2 जणांचा मृत्यु झाला आहे. तर स्वाईनफ्ल्यूचे 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसात 49 रूग्ण मिळाले असून 3 जनांचा मृत्यु झाला आहे. ऑगस्ट महिन्यात स्वाईनफ्ल्यूचे 228 रूग्ण मिळाले असून या महिन्यात अद्याप 9 जणांचा मृत्यु झाला आहे. 15 ते 17 ऑगस्ट मधे नल बाजार येथील 63 वर्षाच्या पवई येथील 74 वर्षीय व्यक्तीचा, तर चेंबूर येथील 2 वर्षीय लहान मुलाचा मुत्यु झाला आहे.
मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले आहेत त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे. पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करित आहे पाऊस जर पडला नाही तर आजार आणखीन वाढण्याची शक्यता आहे जानेवारी ते आतापर्यंत लेप्टो आणि र-वाईन प-लुचे 2372 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे हे खतरनाक आजार रोखण्यासाठी पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे र-वाईन प-लु आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
