उपनगरी रेल्वेचा तोटा वाढतोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगरी रेल्वेचा तोटा वाढतोय

Share This
मुंबई : उपनगरी लोकल मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या गर्दीसोबतच अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. उपनगरी लोकल सेवेचा २0१५-१६ मध्ये तोटा १४00 क ोटी रुपयांवर जाणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळा (एमआरव्हीसी)च्या श्‍वेतपत्रिकेमध्ये म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच उपनगरीय लोकलसाठी श्‍वेतपत्रिका क ाढण्यात आलेली आहे.

पश्‍चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील एकूण लोकल फेर्‍यांची संख्या २८00 वर गेली आहे. काही वर्षांपूर्वी ही संख्या १८00 फेर्‍यांपर्यंत र्मयादित होती. फेर्‍यांची आणि प्रवाशांची संख्या वाढली असली तरी महसूल मात्र वाढलेला नाही. एका लोकलच्या दिवसातून १0 ते १२ फेर्‍या होतात. १२ डब्यांच्या लोकलच्या एका फेरीसाठी रेल्ेवला ९७ लाख १४ हजार रुपये खर्च करावे लागतात तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे फ क्त ५६ लाख १0 लाख रुपयांचे आहे. रेल्वे उपनगरीय मार्गावरील तोट्याचा आकडा दरवर्षी फुगत चालला आहे.

गेल्या ५ वर्षात उपनगरीय रेल्वेचा संचित तोटा हा ४,१५0 क ोटी रुपयांवर पोहोचला आहे. १९९९-२000 मध्ये ८0 क ोटींचा फ ायदा असणार्‍या रेल्वेला २0१४-१५ चा तोटा १४00 क ोटी रुपयांपर्यंत जाण्याची भीती आहे. २00६-0७ पर्यंत तोट्याचा आकडा ५0 कोटी रुपये इतका होता. पण २00८-0९ पर्यंत हा आकडा ३२८ क ोटी रुपयांवर पोहोचला आहे. रेल्वेचा तोटा दिवसेंदिवस वाढत जाण्यामागे आर्थिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याचे मानले जाते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages