मुंबई / प्रतिनिधी - शुक्रवार दि. २५ सप्टेंबर, २०१५
सिंचन घोटाळ्यात ज्याप्रमाणे मंत्र्याची चौकशी झाली, तशी नालेसफाईच्या कामातल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची चौकशी करावी, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

नालेसफाईत भ्रष्ट्राचार झाला आहे, नाले सफाईची कामे समाधानकारक झाल्याचा दावा उध्दव ठाकरे आणि पालिका अधिकरी करत होते. नालेसफाईच्या नावाखाली २००५ पासून हजारो कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार होत आहे. या प्रकरणी फक्त अधिकारी आणि ठेकेदारांवर नाही तर स्थायी समिती अध्यक्ष , महापौर, उपमहापौर तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव यांचीही चौकशी करून एफआयआर दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
सिंचन घोटाळ्यात ज्याप्रमाणे मंत्र्याची चौकशी झाली, तशी नालेसफाईच्या कामातल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची चौकशी करावी, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
पालिका आयुक्त भाजपच्या इशा-यावर कामे करतात, नालेसफाईत भ्रष्ट्राचार सुरु असताना भाजपाचे उपमहापौर काय करत होते, भ्रष्ट्राचार सुरु आहे भाजपा सत्तेत का बसली आहे.भाजपाने पाठिंबा काढून घ्यावा, पालिकेच्या अनेक कामात भ्रष्टाचार, सरकारने याची चौकशी करावी, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
इंदु मिल येथील भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा ४ ऑक्टोबर, २०१५ ला होणारा कार्यक्रम पुढे ढकलला.आता भूमिपूजन ११ ऑक्टोबर, २०१५ रोजी होईल सूत्रांची माहिती आहे. NTCने इंदू मिलची जमीन सरकारला हस्तांतरीत केली नाही, या सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी प्रेम नाही. स्मारकाच्या भूमिपूजना विषयी वारंवार घोषणा करूण सरकार दलितांच्या भावनेशी खेळतेय, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

