मुंबई ( प्रतिनिधी ) - -केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा पेपर ऐन अनंत चतुदर्शी दिवशी ठेवण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. २७ सप्टेंबरला होत असलेली ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली असून याप्रश्नी यूपीएससीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यूपीएससीतर्फे २७ सप्टेंबरला नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अॅकॅडमीच्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार गणित विषयाचा प्रथम पेपर सकाळी १० ते १२ तर सामान्य ज्ञान विषयाचा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे. येत्या २७ सप्टेंबर मुंबईसह राज्यात गणेश विसर्जन असल्याने या काळात परीक्षा देणे ही उमेदवारांसाठी तारेवरची करसत होणार आहे. मुंबईतील अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विद्यार्थी संघटनांची दारे ठोठावली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुधाकर तांबोळी यांनी यूपीएससीच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणात सण साजरा करण्यात येत असल्याने या काळात परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा गोंधळ पहिल्यांदा झालेला नाही. अशाप्रकारचा अनेक गोंधळ या आधीही झाले असून केंद्र आणि राज्य सरकारमधील केंद्रामध्ये सुसंवाद नसल्याने हा प्रकार घडत असून याची दखल घ्यावी, अशी मागणी आपण या पत्रात केली आहे
यूपीएससीतर्फे २७ सप्टेंबरला नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अॅकॅडमीच्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार गणित विषयाचा प्रथम पेपर सकाळी १० ते १२ तर सामान्य ज्ञान विषयाचा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे. येत्या २७ सप्टेंबर मुंबईसह राज्यात गणेश विसर्जन असल्याने या काळात परीक्षा देणे ही उमेदवारांसाठी तारेवरची करसत होणार आहे. मुंबईतील अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विद्यार्थी संघटनांची दारे ठोठावली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुधाकर तांबोळी यांनी यूपीएससीच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणात सण साजरा करण्यात येत असल्याने या काळात परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा गोंधळ पहिल्यांदा झालेला नाही. अशाप्रकारचा अनेक गोंधळ या आधीही झाले असून केंद्र आणि राज्य सरकारमधील केंद्रामध्ये सुसंवाद नसल्याने हा प्रकार घडत असून याची दखल घ्यावी, अशी मागणी आपण या पत्रात केली आहे
