मुंबई / प्रतिनिधी / ८ ओक्टोंबर २०१५
शिवसेनेच्या दंडेलीमुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द केल्यामुळे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आश्चर्य व्यक्त करून जाहिर निषेध केला आहे.
ही गोष्ट खरी आहे की, सीमेवर पाकिस्तानकडून कुरपताखोरी चालू आहे, आपले सैनिक शहीद होत आहेत, वारंवार पाकिस्तानी सेनेच्या गोलीबारीमुळे सीमेवरील गावातील नागरिकांचे जगणेच मुश्कील झाले आहे. साफ साफ दिसते आहे की, केंद्र सरकारने पाकिस्तानपुढे गुडघे टेकले आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेपुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हतबल झाले आहेत, तरीही प्रश्न आहे की, पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून पाकिस्तान सुधारणार का ? याचे उत्तर शिवसेनेने द्यावे, असे निरुपम म्हणाले.
चिंतेची बाब म्हणजे, गुलाम अली यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीही नंतर आयोजकांनी शिवसेनेच्या गुंडागर्दी समोर हार पत्करून आपला कार्यक्रम रद्द केला. शिवसेनेपुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नतमस्तक झाले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, असे निरुपम म्हणाले.
जसे पाकिस्तानपुढे मोदी सरकार नपुंसक झाली आहे, तसेच शिवसेनेपुढे महाराष्ट्र सरकार नपुंसकासारखा व्यवहार करताना दिसत आहे, असे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध म्हणजे देशभक्ती नसून सोयीचे राजकारण आहे, कारण शिवसेना सद्या महानगर पालिकेत हजारो कोटींच्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेली आहे, मुंबईतील जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचा विरोध करीत आहे, शिवसेनेला दाऊद अब्राहीम यांचे सोयरे जावेद मियाँदाद यांचा मातोश्रीवर सत्कार केलेला चालतो परंतु गुलाम अली चालत नाही, असे निरुपम यांनी सांगितले.
भारताचे सुप्रसिद्ध गझल गायक स्व.जगजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले, परंतु शिवसेनेचे सोयीचे राजकारण एवढे भारी आहे की, गुलाम अली यांचा विरोध करीत स्व.जगजीत सिंह यांचा सुद्धा अपमान केलेला आहे, असे निरुपम म्हणाले...
