मुंबई, दि. 18 : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतील सन 2016-17 या वर्षाच्या अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एप्रिल 2016 मधील राज्यातील एकूण प्रलंबित लाभार्थ्यांची संख्या 1,155 इतकी असून, या लाभार्थ्यांसाठी 8 कोटी 19 लाख 93 हजार 600 रुपये इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती. सन 2016-17 या आर्थिक वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या निधीमधून हा निधी वितरीत करण्यात येणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606171136299321 असा आहे.