*सामनाच्या कार्यकारी संपादकांनी माफी मागावी* - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

*सामनाच्या कार्यकारी संपादकांनी माफी मागावी*

Share This
मुंबई - सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या व मोर्चेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या दैनिकाच्या कार्यकारी संपादकांचे आज पर्यंतचे उपद्व्याप पहाता त्यांनाच ''कार्टून'' म्हणावेसे वाटते. त्यांनी या प्रकरणी समाजाची जाहीर माफी मागावी. त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून मानवतेचा अनादर केला आहे. या मागचा बोलविता धनी कोण? असा सवाल करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी अशा प्रकारे समाजाच्या भावनाचा अनादर करणा-या व्यंगचित्राचा निषेध केला. मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत समाज मनाला समजून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सरकार यामध्ये समाधानकारक निर्णय घेईल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages