मुंबई, दि. 11 : केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला आता 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यात मुंबईत येणारे एन्ट्री पॉईंट्स आणि मुंबई शहरातील टोलनाक्यांचाही समावेश आहे.
शासकीय करांची रक्कम जुन्या नोटांद्वारे स्वीकारण्यासही 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासन, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांना देय असलेली फी शुल्क, कर किंवा दंड यांची अदायगी तसेच वीज व पाणी वापरासाठीच्या शुल्काची देयके 500 व 1000 रूपयांच्या जुन्या नोटांव्दारे भरता येतील. कोर्ट फीची रक्कम जुन्या नोटांद्वारे स्वीकारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहक सहकारी संस्थांमध्ये व्यवहार करताना ग्राहकांचे ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. वैयक्तिक देयकांचा भरणा करताना थकबाकी व चालू देयकांची रक्कम भरता येईल तथापि, आगाऊ भरणा करता येणार नाही. शासकीय करभरणा, वीज व पाणी देयकांसाठी 14 नोव्हेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याची राज्य शासनाची विनंती केंद्र शासनाने मान्य केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर, वाहतूकदारांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्गांवरील पथकर माफीची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शासकीय करांची रक्कम जुन्या नोटांद्वारे स्वीकारण्यासही 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासन, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांना देय असलेली फी शुल्क, कर किंवा दंड यांची अदायगी तसेच वीज व पाणी वापरासाठीच्या शुल्काची देयके 500 व 1000 रूपयांच्या जुन्या नोटांव्दारे भरता येतील. कोर्ट फीची रक्कम जुन्या नोटांद्वारे स्वीकारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहक सहकारी संस्थांमध्ये व्यवहार करताना ग्राहकांचे ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. वैयक्तिक देयकांचा भरणा करताना थकबाकी व चालू देयकांची रक्कम भरता येईल तथापि, आगाऊ भरणा करता येणार नाही. शासकीय करभरणा, वीज व पाणी देयकांसाठी 14 नोव्हेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याची राज्य शासनाची विनंती केंद्र शासनाने मान्य केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर, वाहतूकदारांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्गांवरील पथकर माफीची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.