ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचे स्वागत केले आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले असून, आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध सरकारी योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचे स्वागत केले आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले असून, आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध सरकारी योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
