मुंबई । प्रतिनिधी 12 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेत सुमारे 40 हजार पदे रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. रिक्त पदे भरण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी त्यांच्या कार्यकाळात रिक्त असलेली 28 हजार रिक्त पदे त्वरित भरावीत म्हणून सभागृहात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानंतरही महापालिकेने रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आता महापालिकेने तब्बल आठ वर्षांनी चतुर्थ श्रेणीतील कामगारांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी नसल्याने स्वच्छता, सफाई आणि प्रशासनाच्या फायली इतर कार्यालयात पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांना पोहचवाव्या लागत आहेत. यामुळे कामात उशीर होत असल्याने जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गातील 1388 रिक्तपदे सरळ सेवेने भरली जाणार आहे. कामगारांची ही संपूर्ण भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन पद्धतीची भरतीप्रक्रिया आयबीपीएस या नामांकित संस्थेमार्फत घेण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी चतुर्थ श्रेणीतील कामगारांची भरती करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे राज्य शासन आणि टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.
या भरतीसाठी सुमारे 4 लाख अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे. यामध्ये खुला प्रवर्ग व मागासवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातून प्रत्येकी 2 लाख अर्ज येवू शकतात. ठाणे महापालिकेमध्ये भरती प्रक्रिया राबवताना महाऑनलाईन लिमिटेड कंपनीने खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये तर मागास व इतर मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आकारले होते, तेवढेच शुल्क मुंबई महापालिका उमेदवारांकडून आकारणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पार पडली असून स्थायी समितीच्या मान्यतेनुसार भरतीबाबतची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
भरती केल्या जाणाऱ्या 1388 जागा
खात्यांची नावे पदांची संख्या
उपजल अभियंता (परिरक्षण) 260
उपजल अभियंता (प्रचालने) 37
उपजल अभियंता (पिसे पांजरापोळ) 48
उपजल अभियंता (भांडुप संकुल) 26
उपजल अभियंता (मुंबई प्रकल्प 3 ए) 18
उपजल अभियंता (बांधकामे) 76
विभाग कार्यालयातील पाणी विभाग 278
मलनि:सारण व प्रचालने 496
रुग्णालये (केवळ पाच रुग्णालयांसाठी) 80
आरोग्य खाते (केवळ स्मशानभूमीसाठी) 69
2009 नंतर प्रथमच भरती -
उपजल अभियंता (परिरक्षण) 260
उपजल अभियंता (प्रचालने) 37
उपजल अभियंता (पिसे पांजरापोळ) 48
उपजल अभियंता (भांडुप संकुल) 26
उपजल अभियंता (मुंबई प्रकल्प 3 ए) 18
उपजल अभियंता (बांधकामे) 76
विभाग कार्यालयातील पाणी विभाग 278
मलनि:सारण व प्रचालने 496
रुग्णालये (केवळ पाच रुग्णालयांसाठी) 80
आरोग्य खाते (केवळ स्मशानभूमीसाठी) 69
2009 नंतर प्रथमच भरती -
मुंबई महानगरपालिकेत यापूर्वी 2009 मध्ये कामगारांची पदे भरली गेली होती. त्यावेळी सुमारे एक हजार जागांसाठी तब्बल 2 लाख 89 हजार 248 अर्ज प्राप्त झाले होते. या भरतीच्या परीक्षा खुल्या क्रीडांगणात घेण्यात आल्याने उमेदवारांनी बाजूच्या उमेदवाराची उत्तरे बघून पेपर दिले होते. या परीक्षेत बहुतेक उमेदवारांना 100, 95, 95, 80 असे मार्क्स मिळाल्याने उमेदवारांनी आपल्याला नोकरी मिळावी असा दावा केला होता. पुढील 18 महिने ही भरती प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर याची प्रतीक्षा यादी महापालिकेने रद्द केली. आजही या भारतामधील काही उमेदवार आमची प्रतीक्षा यादी तयार करून आम्हाला पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे म्हणून आंदोलने आणि पत्रव्यवहार करत आहेत.