बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात हा कार्यक्रम पार पडल
महापौर तावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांनी मनाने कणखर राहून प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे. घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांचा समाजाने सन्मान केला पाहिजे. “स्त्री समाज घडवते आणि योग्य संधी मिळाल्यास इतिहासही घडवते,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अर्मिडा फर्नांडिस यांनी महिलांमध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे सांगत त्यांना शिक्षण आणि सुरक्षिततेची गरज अधोरेखित केली. तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले असल्याचे नमूद केले.
प्रधान आयकर आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण आणि सतत ज्ञान मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच समाजातील गरजू महिलांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी, कर्मचारी तसेच काही पुरुष कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान स्त्री सक्षमीकरणावर आधारित पथनाट्य आणि पोवाडाही सादर करण्यात आला.
दरम्यान, महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामार्फत महिलांना कायदेशीर, वैद्यकीय व समुपदेशनाच्या सुविधा दिल्या जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


No comments:
Post a Comment