मुंबई : आदिवासी महिलेच्या मालकीची जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर तालुक्यातील उमरोली येथे उघडकीस आला आहे. या महिलेने आपल्याला न्याय मिळण्यासाठी 28 डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. पालघर तालुक्यातील ठमाबाई सोमर्या रिंजड यांची उमरोली येथे 5 एकर जमीन आहे. ठमाबाईंच्या गरिबीचा तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन उमरोली येथील दीपक श्रीधर पाटील यांनी त्यांची फसवणूक करून जमीन हडप केली आहे. ही जमीन हेच त्या महिलेचे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. तीच बळकावल्यामुळे ठमाबाई यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. आपली बळकावलेली जमीन परत मिळवण्यासाठी ठमाबाई रिंजड यांनी 28 डिसेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच जमीन बळकावणार्या दीपक पाटील यांच्यावर जात प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांक डे केली आहे.
Post Top Ad
16 December 2012
Home
Unlabelled
आदिवासी महिलेची जमीन बळकावली
आदिवासी महिलेची जमीन बळकावली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment