अजिंठा लेण्यांचा होणार हायटेक मेकओव्हर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2014

अजिंठा लेण्यांचा होणार हायटेक मेकओव्हर

AJINTHA CAVES1
भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब म्हणजे येथील इतिहास. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र अनेक ऐतिहासिक वास्तूंची पडझड झालेलीच पहायला मिळते. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि पर्यटनामध्ये मानाचा तुरा रोवणारे एक स्थळ म्हणजे औरंगाबाद येथील अजिंठा लेणी. 2 हजार वर्षे जुन्या असलेल्या या लेण्यांची काही प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मात्र लवकरच अजिंठा लेण्यांचा हायटेक मेकओव्हर होणार आहे. अजिंठा लेण्यांचा हा मेकओव्हर करण्यासाठी आयआयटीचे विद्यार्थी नव्याने लेण्यांची रचना करणार आहेत. 

अजिंठा लेण्यांना `युनेस्को’ या संस्थेने जागतिक वास्तूचा दर्जा दिला आहे. आयआयटीसोबतच विविध संस्था मिळून हा उपक्रम राबविणार आहेत. यामध्ये अजिंठा लेण्यांचे जतन, संवर्धन आणि स्थापत्त्याचा विकास याचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढत आहे. आयआयटीच्या औद्योगिक रचना केंद्र या विभागातर्फे हा मेकओव्हर करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाचीही मदत घेण्यात येणार आहे. महिन्याभरापूर्वी माहिती संकलन आणि सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. इसवी सनपूर्व काळामध्ये अजिंठा लेण्यांचा शोध लागला. या लेण्यांमध्ये एकूण 30 पाषाण आहेत. भारतीय कला आणि चित्रकलेचा उत्तम नमुना म्हणून अजिंठा लेण्यांकडे पाहिले जाते. विष्णुधर्मोत्तर पुराणातील काही कथाही या लेण्यांमध्ये कोरल्या आहेत. सुमारे 7 व्या दशकामध्ये या कथा कोरल्या गेल्या आहेत. याचेही आयआयटीचे विद्यार्थी जतन करणार आहेत.
भूशास्त्र, भौगोलिक माहिती, सिव्हील इंजिनिअरिंग या सगळ्याचा अभ्यास या जतन उपक्रमासाठी करण्यात येणार आहे. या लेण्यांचे मूळ रंग नीट राहावेत यासाठी केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच लेण्यांमधील चित्रांची, शिल्पकलांची आणि स्थापत्याची पुनर्बांधणी करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच हा विभाग डिजीटल माहिती विकसित करणार असून त्याचा फायदा पर्यटक, विद्यार्थी आणि विविध तज्ञमंडळी यांना लेणी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी होणार आहे. टप्प्याटप्प्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, पर्यटकांची ने-आण करण्यासाठी खास पालखी डिझाईन करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय या उपक्रमासाठी निधी पुरविणार आहे. या उपक्रमासाठी किती निधी लागणार आहे हे अजूनही निश्चित झालेले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS