राहुल गांधींवरील टीकेवरून भाजपवर वर्षा गायकवाड यांचा पलटवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2026

राहुल गांधींवरील टीकेवरून भाजपवर वर्षा गायकवाड यांचा पलटवार


मुंबई | जेपीएन न्यूज - दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाई आणि काँग्रेस नेत्यांविरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल टीका करत, "विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, याचे उत्तर सरकारने द्यावे," अशी मागणी केली.

वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरोप केला की, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भाजप सरकार लोकशाहीविरोधी भूमिका घेत आहे. काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे "चोर तो चोर, वरून शिरजोर" असा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावरही त्यांनी टीका करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. तसेच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, दिल्लीतील घडामोडींच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने लोकभवन परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष रवी बावकर, केतन शाह, अर्शद आझमी, भावना जैन, राजपती यादव, नगरसेवक हैदर अली शेख, अजंता यादव, वखार खान, राजेश शर्मा, अवनीश सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS